३३ कोटींचं(देव) भांडवल येणाऱ्या शतकात नक्कीच कमी होणारं …
देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.अर्थात देव अस्तित्वात नाहीत असं ठकावणारा एकच जगातील। बाप बाबासाहेब आंबेडकर! असे महान विज्ञान विचार ६० वर्षापूर्वी दिले.पहा मित्रानो,भारतात नाही तर या हिंदुस्थानातील कोणताही देव नवसाला पावतो. रोज काल्पनिक मूर्ती समोर घंटा वाजवून काही तरी मागणारा अंधश्रदाळू जातात येताना हिंदू मंदिरात दिसतो.आता तर दहा दिवस लाखो नवस बोलले जातील, कोणतंही मागणं सृष्टीनं निर्माण केललं फळ अर्थात नारळ गणपतीच्या पुढ्यात ठेवून मागितलं तर नक्कीच मिळेल अशी कधीही पूर्ण न होणारी आशा भटजी शेटजी मंडळीन सांगून अशा खुळचट विचारात शंकर पार्वतीच महान बुद्धिवंत ‘मळा’न बनविलेल व दरवर्षी जन्म घेणारं विघ्न दूर करणार लेकरू गणपतीला ठाण मांडून बसविलेली मंडळे या दिवसात वर्षभराची नव्हे अनेक वर्षाची कमाई करण्याकरिता खोटा प्रचार करून सामान्य अतिसामान्य बुद्धीभ्रष्ट केलेल्या गरीबाच्या मागासलेल्या अडाणी लोकांना देवाची भीती दाखवून लुटण्याचा प्रकार केवळ या महाराष्ट्रात नव्हे तर अखंड हिंदुस्थात होत असून याला फसवणूक, भ्रष्ट्राचार म्हणून का पाहू नये? सरकार तर मनुवादी विचारांचेच असून गरिबांची लुबाडणूक थांबावी याकरिता न्याय व्यवस्था भारतात उपलब्ध असताना भारतातील न्यायालय स्वतःची कणखर भूमिका देशहित लक्षात घेऊन का मांडू नये? हीच देशाची खरी मनुवादी शोकांतिका आहे.
केवळ असत्याचा कल्पनिक्तेचा अंधश्रद्धेचा काळाबाजार रचून हिंदुस्थानात श्रद्धेच्या नावाखाली अखंड कुटुंबाला बरबाद करण्याची क्षमता मनुवादी भटांनी निर्माण करून देशाला विज्ञान विचारा पासून रोखण्याच षडयंत्र सनातनी लोक करीत असून येत्या काळात अवघ्या हिंदुस्थान म्हणणाऱ्या हिंदुत्व विचाराला कुंभमेल्यात नागडं अश्लीलतेचा कळस असणाऱ्या हीन विचाराला व हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे असं म्हणणाऱ्या विचारालाच भारतातील राष्ट्रीय संपत्ती असलेल्या पाण्यात बुडवून भारतातील वास्तव अस्तित्व असलेल्या इतिहास विज्ञान विचाराला बुडविण्याचा कटच निर्माण करून देशातील बहुजन लोकातील मागासलेल्या उपेक्षित गरीब समाजाला उकिरड्यावर फेकण्याचा मानस असून त्यांना नकळतच दरवर्षी येणाऱ्या व विसर्जन होणाऱ्या गणपती सारखाच बुडवून अर्थात कायमच विसर्जन करणार व त्यांच्या विज्ञान विचाराला तिलांजली देत बुडविणार अशीच एकंदर भूमिका मनुवादी विचारांची असून त्याला केवळ आळा ,वैचारिक विरोध विज्ञान विचारांचे सामाजिक विचारांची जोड असणारे,इतिहासकालीन विचाराला घेऊन जाणारे व गौतम बुद्ध, शिवाजी महाराज .महात्मा फुले शाहू महाराज ,व मनुवादी ब्राम्हणी व्यवस्था यावर सत्य अर्थात ३३ कोटी देव नाकारणारे डॉ..बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून डोक्यातील छोट्या मेंदूत कायमचं बंधिस्त करून विज्ञानवादी विचार यांना आपलस करून पुढे जात आहेत तोच सत्य विचार हिंदुस्थानातील काल्पनिक अंधश्रद्धा नवस यांचा प्रचार करणाऱ्या हिनवृत्ती विचारावर नक्की वार करून भारताचं लिखित संविधान जगाच्या पाठीवर किती महान आहे.व भारतातील मूळ जन्म घेतलेल्या बुद्धाचे विचार किती वैज्ञानिक आहेत हे पटवून देण्याची भूमिका पार करणारच एवढी शास्वती आहे.
पहा महत्वाची बाब मित्रहो,, हिंदुत्ववाद जपणाऱ्या व सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारच्या परदेश दौऱ्यावरून अधिक उजेडात येत असून भारताचे प्रधानमंत्री व त्यांच्या सहकारी बौद्धराष्ट्र असलेल्या देशात प्रथम भेट देत असून अर्थात विज्ञान दृष्टीकोन असलेल्या देशात उदा: भूतान,नेपाल,म्यानमार व आजच जपान सारख्या विज्ञान प्रगत देशात हिंदुत्व दडलेला पंतप्रधान जातात हेच खर मोठं आश्यर्य आहे.मित्रानो,या लोकांनी हिंदुत्व कितीही जपलं तरी परदेशात जाताना प्रथम6 बुद्धत्वाची जाणीवच बरोबर असल्याशिवाय,घेतल्याशिवाय जावूच शकत नाही.हे अधोरेखित आहे सत्य आहे.त्यामुळे काल्पनिक देवांचा कितीही बाजार मांडला व हा बाजार केवळ स्वार्थासाठी स्वतःसाठी असून गरीब लोकांची फसवणूक आहे हे मनुवादी जाणून आहेत.
पहा मित्रानो,बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दीक्षा देऊन अर्थात प्रवर्तन करून मोजकीच काही ६० वर्ष झाली आहेत,आज अनेक लोक बुद्ध अर्थात विज्ञान विचार घेत असून येणाऱ्या काळात लक्षणीय बदल होतील. येणारा काळ बुद्धमय काळ असेल तिथ कोणतही काल्पनिकता नसेल सामान्य लोकांना मांगण नवस नारळ लिंबू देऊन काही तरी लाभ मिळेल अर्थात इच्छापूर्ती नसेल फसवणूक नसेल.केवळ मानव आहोत मानव म्हणूनच वावर होणार.केवळ हिंदुस्थात जाणीवपूर्वक निर्माण करून ठेवलेले ३३ कोटींच भांडवल येणाऱ्या शतकात नक्कीच कमी होणारं कारण बहुजन समाज खरा इतिहास जाणायला, वाचायला लागला आहे.त्यामुळे नैसर्गिक विज्ञानयुग सत्यान चालणारा सत्य विचार पावलोपावली निर्माण होऊन हीन विचार गाडले जाऊन नवं विचार अस्तित्वात उभे करण्याकरिता विज्ञान मार्ग सकाळी उगवणाऱ्या युगसुर्याप्रमान कोवळ्या सोनेरी किरणांच्या उबदार छायेत नक्कीच उजळतील मिळतील .
माझ्या निळ्या नभाचा आसरा या काव्य संग्रहातील दोन वास्तव कविता सादर…
1) ‘ महाजन्म’…
आईवडिलांनी आम्हा “जन्म” दिलाच
परंतु “महाजन्म” जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी
तथागन्तान्च्या धम्माचा दिला नसता
तर आज हि आम्ही
“मनु”वादि याच्या घराच्या
कोप-या वरील न धुतलेल्या
भांड्यातच खावे लागले असते
हे आपण पहिले आहे
पण आजचा तरुण,तरुणी
विसरतेय याच मला
आज हि दुख वाटतंय ….आज …
2) वर्तमान
पाणी असताना कशाला
राहता वाळवंटात
बाबांनी धम्मचक्र प्रवर्तन
करूनही का जगता अश्पृशात
या हिंदू संस्कृतीत
नटलेल्या बेगडानो
बाबांना का ठेवताय गुलदस्त्यात
अरे बाबांचेच विचार सांगा
आम्ही बुद्धच म्हणुनी जगू वर्तमानात …….बुद्धच
राजेश सावंत ( साहित्यिक,वक्ता ,युवा मार्गदर्शक)