“फुले शाहू आंबेडकर” हेच पुरोगामी विचारांच खरं उगम स्थान!
‘पुरोगामी विचार मांडणारे ‘शहीद’ होतात,सीमेवर लढून अखेरचा श्वास घेणाऱ्या जवानासारखे!’
महाराष्ट्रातील वास्तव सत्याच जतन करणारा खरा इतिहासाच्या विचारांचा गाभ्याचा रथ अर्थात वारसा पुढे विज्ञान रूढीन मांडण्याचा सांगण्याचा हाकण्याचा दौडण्याचा खऱ्या अर्थानं लिखित स्वरूपात लिहून ठेवण्याचा महान पराक्रम फुले शाहू आंबेडकर या महान त्रीमुर्तिनी केला म्हणूनच महाराष्ट्रातील चळवळीतील असंख्य बांधव पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून आदराने म्हणतात.
फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात पुरोगामी विचार सांगणाऱ्या लिहीणाऱ्यांची दिनदहाडे गोळ्या घालून हत्या केली जाते.हेच या महाराष्ट्रच दुर्दैव्य असून गोळ्या झाडणारे कोण?अंगावर गोळ्या झेलणारे कोण? मारणारे कोण? मरणारे कोण?गोळ्या झाडण्याचा आदेश देणारे कोण? हत्या करण्याकरिता सुपारी देणारे कोण?सुपारी घेणारे कोण?अर्थात भारत देशातील, महाराष्ट्रातील रक्ताचे भारतीय बांधवच?
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा सच्चा समर्थक अनिसचे मा.नरेंद्र दाभोळकर(ब्राम्हण)यांची निर्घुण हत्या पुणे येथे झाली.दुसरे कॉमरेड मा.गोविंद पानसरे (बहुजन समाज) यांची हत्या कोल्हापूर या ठिकाणी, अगदी दाभोलकरांची झाली त्याचप्रकारे गोळ्या झाडून करण्यात आली.महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांची नांदी पुरोगामी विचार घेऊन मांडनार्यांची झाली अर्थात हे पुरोगामी सत्य विचार सांगणारे कोण? दोघेही भारतीय (हिंदूच)? मग यांची हत्या का कुणी व कशाकरिता करावी? अथवा केली असेल? पुरोगामी इतिहासाचा विचारांचा वारसा जोमानं व अगदी बुद्धिप्रामाण्यवाद जोपासून मांडताना धर्मांध व्यवस्था डोळसपणे न स्वीकारतात दुसऱ्यांच्या खांद्यावर इशारा देत डोळ्यावर जिवंतपणी कफ़न बांधून गोळ्या झाडायला सांगतात यालाच भ्याड हल्ला म्हणतात विचारांचा लढा हा विचारांनीच अगदी मांडीला मांडी लावून लढवायचा असतो.पण काही अदृश्य पण सदृश्य धर्मांध शक्ती महाराष्ट्रात नथुराम घोडसे निर्माण करून दहशीतीच षड्यंत्र बनवू पाहत आहेत.अशा धर्माच्या आहारी गेलेल्या माणसापेक्षा धर्म मोठा आहे असे मानणाऱ्या विचारांचा नक्कीच धिक्कार करावा लागेल.
सत्याला वास्तवाला न मानणाऱ्या धर्मांध विचार मुळात निर्जीव दगडा सारखाच असतो.त्याला मुळात बुद्धी नसते. केवळ डोळ्यावर पांघरलेल्या जाणीवपूर्वक झोपेच सोंग घेणाऱ्या हातात दगड जरी दिला तरी तो मारण्याचा धाडस आंधळेपणाने नक्कीच करतो.कारण सत्याच्या संवेदना मुळात नाहीश्या झालेल्या असतात. त्याच्या विचाराला नपुसंक केलेलं असत. त्याला केवळ निर्जीव दगडच म्हणता येईल.हातात घेतला, फेकला मग तो कुटेही लागो कुणाला तरी नकळत जखम करून जाणार फेकणारे धर्मांध रूढीला कवटाळणारे याचमुळे पुरोगामी विचारांचा बळी जात आहे.फुले शाहू आंबेडकर यांनीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात बहुजन समाजाला खरा वास्तव इतिहास लिखित स्वरुपात सांगितला.कोण तरी म्हणत या तथाकथित महापुरुषांच्या आधी शिवाजी संभाजी महाराजांचे नाव का घेतलं जात नाही? अहो महाशय, शिवाजी, संभाजी महाराज यांचा वास्तव खरा सत्य इतिहास जो चुकीच्या पद्दतिन सांगितला गेला तो इतिहास या त्रिमुर्तिन अगदी डोळसपणे सांगितला लिहून ठेवला तेंव्हाच आपल्याला खरा शिवाजी, संभाजी महाराज कळाला.उदा.महात्मा जोतिबां फुलेंनी शिवाजी महारज कोण होते याचा शोध घेत किल्ले रायगडावर प्रथम पावूल ठेऊन या अवघ्या महाराष्ट्रात पहिली जयंती त्यांनी साजरी केली हा इतिहास आहे.याची जाणीव या महामानवांनी करू दिली.
मित्रहो,येथील प्रस्थापित मनुवाद्यांनी, विषमतावाद्यांनी खरा शिवाजी संभाजी नव्हेतर अनेक राजे महाराजे पूर्वज मूळधर्म रूढी परंपरा मूळ गाभ्याचा ठावठिकाणा लिखित स्वरुपात अधोरेखित करून ठेवला म्हणूनच फुले शाहू आंबेडकर यांना पुरोगामी विचारांच उगम स्थान म्हटलं जात. हे कोण नाकारू शकत नाही.कारण हा सत्याचा लढा होता. तोच सत्याचा मूळ विचार घेऊन पुरोगामी वारसा पुढे चालवण्याचा मार्ग पत्करणाऱ्या स्वतःच्याच रक्तातातीलच बुद्धीवांताना त्यांनी तारुण्यात पेरलेली पुरोगामी विचारांची झाडे वाढवल्यानंतर वयाची शंभरी जवळ येत असतानाच कुणाच्या सदृश्य शक्तीच्या आदेशानुसार काही धर्मांध तरुण रक्त त्यांच्या बुद्धीचा नव्हे तर असाह्य नकळत भ्याड हल्ला करतात.हा हल्ला नक्कीच हास्यास्पद म्हणावा लागेल.मनुवादी विषमतावादी विचारांना खतपाणी टाकनार्यांनी घालणार्यांनी महाराष्ट्रातील काल्पनिक विचार धारा न मानता, सत्यवादी वास्तववादी विज्ञानवादी अर्थात पुरोगामी विचारांचा बुद्धीवंता सारखा समतोल साम्यवादी सकारात्मक विचार करून का स्वीकार करू नये?मनुवादी विषमतेचा काल्पनिक काळाकुट्ट अंधार हा बुद्धिवादी पुरोगामीच्या विरोधात आहे अर्थात धर्मांध भूमिका स्वीकारून माणसापेक्षा धर्म मोठा हे तत्व मानणाऱ्या शक्तीचा षड्यंत्राचा आहे तो येणाऱ्या काळात वैज्ञानिक दृष्ट्या कसा सकारात्मक समान होईल व त्याचा सन्मान कसा राखता वाढवता येईल याचा विचार होणं आजची गरज आहे.
पुरोगामी विचारांची सत्य खरी मांडणी व वैज्ञानिकरित्या पार पाडणाऱ्या सांगणार्या बुद्धी विचाराला मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याने यापुढे छातीठोकपणे फुले शाहू आंबेडकर विचाराला वंदन करूनच अगदी बेधडक सांगावेत.आज गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोळकर भ्याड हल्यात शहीद झाले ते स्वतःच्या स्वार्थाकरिता किंवा स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरिता नाही अथवा गर्भश्रीमंत होण्याकरिता नाही तर येणाऱ्या नवीन पिढीला खरा सत्य पुरोगामी इतिहास कळावा, जाणीव व्हावी यासाठी त्यांनी स्वतःचा अगदी उघड्या डोळ्यांनी अखेरचा श्वास घेऊन पुरोगामी असणारा डोळस महामार्ग देऊन गेले.’पुरोगामी विचार मांडणारे ‘शहीद’ होतात,सीमेवर लढून अखेरचा श्वास घेणाऱ्या जवानासारखे!’यदाकदाचित याहीपुढे फुले शाहू आंबेडकर यांचे सत्य खरे पुरोगामी विचार मांडताना धर्मांध अर्थात माणसापेक्षा धर्म मोठा मानणार्या जपणाऱ्या शक्तीचा नकळत हल्ला होईल मात्र शिवराय, संभाजीराय, भिमराय, फुलेराय, शाहूराय यांच्या विचाराना कायमच स्वीकारून स्मरून पुरोगामी विचारांची धारधार तलवार जी दोन्ही बाजूने तळपते ती बुद्धीन सामर्थ्यानं हातात घेऊन स्वार होवुया बुद्धीन वार करूया.अवघे विचार हे मेलो तरी कायम अजरामर राहणारच. तरच संपूर्ण महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा वारसा सांगेल.मित्रहो, संपूर्ण भारत देश व त्यातील राज्य यांच्या अंतर्गत होणाऱ्या घडामोडीचा विचार करीत नाही ते पुरोगामी विचाराला अनुसरतात की नाही याच्याशी सद्यस्थितीत आपल्याला काही देणं घेणं नाही.हा केवळ महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासाच्या अस्तित्वाचा नाजूक प्रश्न आहे.ती अस्मिता जोपासायाची अखंड टिकवायची आहे.
लेखक : राजेश सावंत ( चेअरमन – ‘आसरा ‘ एजुकेशन आणी सामाजिक संस्था )