Quantcast
Channel: AMBEDKAREE.com
Viewing all articles
Browse latest Browse all 860

भारतीयहो, ये मन कि बात नही है! ये तो लिखित संविधान कहता है!

$
0
0

भारतीयहो, ये मन कि बात नही है! ये तो लिखित संविधान कहता है!

हिंदू धर्म हा संकटात आहे अशी जाणीवपूर्वक वक्तव्य गेली अनेक वर्ष हिंदुत्व जपणारे मुख्य प्रवर्तक करीत असून, काही दिवसापूर्वी बीजेपीच सरकार केंद्रात निवडून आल्यापासून अवघे सरकारच विश्व हिंदू परिषदेच्या उशीवर डोकं नाही तर त्यांच्या पायावर डोकं ठेवून वाटचाल करीत आहे.अर्थात त्यांनी छुपा अजेंडाच नाऱ्याच्या हाती सोपवलाय.त्यामुळे आर. एस. एस. ला वाटू लागलंय. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व सिद्ध करून भारताचे हिंदुस्थान निर्माण करू? आर एस एस या जातीवादी संघटनेन ठरवलेल्या छुप्या हिंदुत्वाच्या अजेंडा नुसार नको ती वक्तव्य करून भारताच्या संविधानाप्रमाणे शपथविधी ग्रहण करणाऱ्या अनेक हिंदुत्ववादी खासदार आमदार मंत्रीसंत्री संविधांनाचा अपमान करीत असून खरंतर हा संविधानाच्या विरोधात उभारल्या जाणाऱ्या जातीवादाच्या अनैतिक भिंतीच उभारीत आहेत असंच म्हणावे लागेल.ज्या महान ग्रंथान अर्थात संविधांनान भारतीय स्त्रीला ताट मानेना उभं केलं, सन्मान अधिकार दिला त्या विचाराला विसरून, मनुस्मृतीप्रमान देशातील इतर स्त्री प्रमाणे ब्राम्हण स्त्री सुद्धा अतिशूद्र गणली गेली त्यातीलच एक सतत संसदेत गदारोळ करणारी आताच्या मनुवादी सरकार मधील केवळ नामधारी असलेली परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य म्हणते, हिंदू ध्रर्माचा ‘गीता’ हा राष्ट्रीय ग्रंथ मानला जावा? आधार केवळ तो ग्रंथअमेरिकेच्या राष्ट्राप्रमुखाना येथील मनुवादी प्रधानमंत्री यांनी भेट दिला म्हणून? मात्र दोन दिवसातच स्वताच तोंडावर पडली दात घश्यात घातले गेले.
भारतीय संविधान हा जगातील नावाजलेला महान ग्रंथ असताना भारतातील प्रत्येक बांधवांनी अगदी डोळसपणे वाचून काढावा असं आवाहन न करता रथयात्रा काढून हिंदुत्व जागृत करून राम मंदिर उभारुच हा नारा देणारे सर्वात बुजुर्ग व मेडीयावर सर्वात तरुण सफेत मिशीवर ताव मारणारे, प्रधान मंत्री मीच होणार अशा स्वप्नात रंगून जाणारे लाल कृष्ण अडवाणी म्हणतात रामायण महाभारत संपूर्ण भारतीयांनी वाचावे? खरचं वाचावे..मात्र ते पूर्ण वाचावे अर्धवट नकोच. नाहीतर द्रोपदीची साडी सांभाळणारा कृष्ण सुद्धा किती काळ्या मनाचा होता हे सुद्धा कळल्याशिवाय राहणार नाही.अगदी नकळत कळेल.एवढा मोठा “व्यास”त्यात दडला आहे.मग त्यातील प्रत्येक अ’पात्र’ किती खालच्या थराला जाऊन स्वतालाच देव याची नाहक भूमिका वटवताना भासू लागतो.आजच्या काळात कोणाच्याही तोंडांतून सहज बाहेर येणारं वाक्य ” मी काय तुझं रामायण महाभारत ऐकायला आलो नाही” यावरूनच या ग्रंथाची महती कळते,येते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी जाणीवपूर्वक प्रतिपादन केलं होत,या भारताचा महान संविधान ग्रंथ मी स्वतः अर्थात बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीला ,दुसरं हिंदू धर्माचा एक धार्मिक ग्रंथ महाभारत व्यास यानं लिहीला,दुसरा ग्रंथ रामायण हा वाल्मिकी यानं लिहीला. पहा या तिन्ही ग्रंथाचे लेखक मनुस्मृती प्रमाणं अतिशूद्र आहेत.खालच्या जातीतील आहेत. असं असताना सुद्धा अवघा भारत व त्यातील नांदणारे भारतीय व त्यातील विषमतावादी कर्मठ हिंदुत्ववादी आजही स्वीकार करून वाटचाल करीत आहेत.हेच तर खर आश्चर्य आहे .खरी गोम आहे.
भारतदेश आज इतर देशांच्या तुलनेत केवळ लिखित संविधानामुळे अधिक सर्वांगी सक्षम आहे.हे मनुवादी विचारांचे लोकही नाकारू शकत नाही.कितीही संविधांनाच्या विरोधात बोंबाबोंब केली तरी त्याच्या चौवकठी शिवाय कोणताही निर्णय घेऊच शकत नाही.भारतीय संविधानाचे नुकतेच संयुक्त अरब अमिरात मध्ये अरबी भाषेत भाषांतर करून तेथिल लोकांना भारतातील असणाऱ्या अनेक जाती धर्माच्या लोकांना कसे गुंफले आहे याचा अभ्यास करण्याकरिता व त्याप्रमाणे वागण्याकरिता नक्कीच अधिक उपयोगात येईल अशा प्रतिक्रिया आहेत.नेपाल हा देश सुद्धा भारताप्रमाणे आमच्या देशाची राज्यघटना असावी असे मत आहे.याआधी या लिखित घटनेचा आदर गौरव स्तुती अमेरिका लंडन आफ्रिका या देशांनी तर केंव्हाच केली आहे.त्यामुळे आर एस एस प्रणीत सरकार हो, काही दिवसातच हिंदुत्वाची भूमिका जाणीवपूर्वक मांडणाऱ्यानी अर्ध्यावरच डाव संपणार याची चाहूल ‘ मोडी’ सरकारला लागली असून सकारत्मक भूमिका न घेतल्यास धर्मनिरपेक्ष असलेला अवघा देश अगदी उघड्या डोळ्यांनी पाहणार अमिशांचा डांगोरा पिठणारा नाऱ्या गडगरणार हे भाकीत आहे.
कारण आम्हाला मन कि बांत करावयाची गरज नाही. मनातील काल्पनिक गोष्ठी वर विश्वास नाही कारण ‘मन कि बात’ ऐकताना आपली केविलवाणी अवस्था जाणायला एवढे भारतीय दुधखुळे नाहीत.कारण या मन कि बात या सर्व प्रश्न उत्तर या भारतीय राज्यघटनेत अर्थात संविधानात आधीच अधोरेखित केल्या गेल्या आहेत.त्याची संपूर्ण अमलबजावणी करा. कोण मायकालाल संविधाना विरोधी कृत्य करेल? कालच ‘मन कि बात’मध्ये आपण अमली पदार्थ सेवन करणं व वेसन करणं विनाशाच ठरू शकतं.हे सांगण्याची गरजच का भासली ?जर का संविधान रुपी भारत निर्माण जागृत करावयाचा असेल तर संविधानात प्रत्येक प्रश्नाला विषयाला धरून त्यावर उपाय उत्तर आहेत. मात्र आपल्या स्वार्थाकरिता ते न राबविता प्रधानमंत्री मन कि बात सांगतो आहे. म्हणून लोकांनी ऐकावे अशा स्वार्थपणाची संविधानिक असणाऱ्या देशाच्या सेर्वोच्च पदाला शोभा देत नाही.कारण संविधानातच मन कि बात याची सर्वच्या सर्व उत्तरे लपली आहेत.त्याची केवळ अंमलबजावणी करा .देश सुतासारखा सरळ व्हायला वेळ लागणार नाही.मात्र स्वताची पाच वर्ष निघावीत, याकरिता स्वतःच वेगळा स्थान निर्माण व्हावे. अगदी खेड्यातील सामन्य अडाणी लोकांपर्यंत आपली गोड मधुर वाणी कायमची पोहोचावी या करता हा खटाटोप असून याला स्वार्था शिवाय आणखी काय म्हणू शकतो?
भारतीयहो, ये मन कि बात नही है! ये तो लिखित संविधान कहता है! ओर बाबा साहबने हर कलम का एस्तिमाल करके उत्तर भी लिखा कर रखा है.हे ध्यान मे रखिये. वही प्रधानमंत्री हर रविवार को मन कि बात मे खुद का स्वार्थ निर्माण करने के लिये दोहराते है! मित्रहो,संविधान हि अपना सेर्वोश्रेस्ठ महान ग्रंथ है.कोई मायकालाल पैदा न होगा ये पृथ्विपर ओ बदल सके! केवल जागरूकता अपना मकसद इरादा बुलंद होना जरुरी है! धर्मनिरपेक्षता जपली तर कोण कोणाचा धर्म संकटात येणार नाही. मात्र यांनाच भीती वाटत आहे. हे सुद्धा एक गमक आहे. भारतीयहो, भारतीय संविधानच अति सक्षम आहे.सर्व जाती धर्माच्या लोकांना सामावून घेणारं आहे.केवळ हिंदुत्व वादी,विषमतावादी लोकांचा पोटशूळ आहे, कांगावा आहे.त्यांनी केवळ सकारत्मक भूमिका घेवूनच भारतीय म्हणून जगावे.देश अधिक सक्षम होईल.देश हिंदुस्थान नसून भारत आहे असे आपलाच धार्मिक ग्रंथ ‘महाभारत’ सांगतो याचं आकलन करा.पुढील रविवारी मन कि बात मध्ये हिंदू धर्म संकट मे है ! अशी मन कि बात मध्ये सांगण्याचा केवीलवाणी प्रयत्न कदाचित होईल. अशी शंका वाटू लागली आहे. संविधान विरोधी विषमतावादी लोकांनी विचारपूर्वक स्वतःची विधान मेडिया समोर मांडताना प्रथम भारत देशाचा विचार करूनच भारताच्या सक्षम लिखित संविधानाचा जगात अपमान होईल असं कृत्य करू नका.जयबुद्ध, जय भारत !

राजेश सावंत (लेखक कवी , चेअरमन – ‘आसरा ‘ एज्युकेशन आणी सामाजिक संस्था)


Viewing all articles
Browse latest Browse all 860