विषमतावादी लोकहो,’घरवापसी’? कोणत्या घरात करणार?
‘घरवापसी’ या सदराखाली एका फसलेल्या असाह्य, गरीब, नाबालिक कुमारिकेला नकळत होणारी मळमळ, अचानक पोटाचा आकार वाढू लागताच अर्थात चुकून लागलेल्या डोहाळ्या
प्रमाणं घाबरलेल्या घरकुटुंबासहित चलबिचल झालेली आता काय करू? कोणता निर्णय घेवू? असाच ‘घरवापसी’ प्रकार म्हणावा लागेल?. भारतातील मूळ बुद्धधम्माच्या वाटेवर एक नव्हे
अनेकजण असून महाराष्ट्रात १९५६ नंतर अनेक बहुजनांनी बौद्धधम्म स्वीकार केला असून त्यांच्या पावलावर पाऊल मा.हनुमंत उपरे काकांच्या अभियान संकल्पनेतून,व अनेक बहुजन कुटुंब त्यात बामन, ९६ कुली समजणारे जातिपंथाचे सर्व बौद्धधम्माचा इतिहास वाचून अभ्यास करून अनेक लोक भारतातील मूळ बुद्धधम्माकडे वळत आहेत. हीच मनात भीती शंका मनुवादी लोकांत निर्माण होऊन, याच विषमतेच्या विस्मृतीतून जागृत झालेली विनाश करणारी बांडगुळ,विषमतेचा फतवा उगारणारे बडवे जिथ रस्ता दिसेल तिथे तग धरून वेली पसरावयास लागले आहेत.
बहुजन समाज जागृत होऊन खरा मूळ विज्ञान बुद्धधम्म स्वीकारतील हि सत्यता स्वीकारून जाणीवपूर्वक ‘घरवापसी माध्यमांतून नाहक नाक दाबून गंगेत डुबकी मारण्याचा प्रयत्नांत आहेत.मात्र घरवापसी कोणत्या घरात करणार? पहा भारतात अनेक धर्म जाती उपजाती असून भारतदेश धर्मनिरपेक्ष आहे.भारतात असंख्य जातीतीत ब्राम्हण (जातीचा) नावाचा माणूस अधिक उच्च, श्रेष्ठ वर्णात गणला जातो. घरवापसी नारा देणार्यांनी मुळात असं जाहीर करावं की,सर्व भारतीयांना उच्च ब्राम्हण जातीतच घरवापसी, समाविष्ठ करून घेऊ व अवघ्या भारतात कोणताही जातीभेद,जातीयता, कोण खालच्या जातीत असणार,मोडणार नाही अर्थात हा ‘भारत’ ,भारतातील असंख्य बांधव केवळ ‘भारतीय’ म्हणूनच वावरतील, नांदतील.असं जाहीर आवाहन करा.विषमतावादी मनुवादी हो,केवळ “आवाहन” न करता “आव्हान” स्वीकारा. देशातील नागरिक नक्कीच विचार करतील.
‘घरवापसी’ हे काय हिंदूंची पवित्र गंगा नदी साफ करण्याकरिता ३०० कोटी संसदेत मंजूर करून सुद्धा अमेरिकेच्या मेडीशन सेंटर मधील अनिवाशीय भारतीयासामोर हिंदुत्ववादी मा. प्रधानमंत्री हात पसर्ण्यासारखी केविलवाणी अवस्थाच म्हणावी लागेल.हशास्पद नक्कीच आहे.भारतातील नागरिक सुज्ञ जागृत विज्ञान विचारांचा झाला आहे.ताजं उदाहरण पहा, धर्माला कवटाळून बसलेल्यां पाखंडी लोकांना राजकुमार हिरानी दिग्दर्शित ( धर्म हिंदू जात सिंधी ) पी.के. चित्रपटात काल्पनिक देवांच्या नावावर भीतीचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रकार उघडकीस आणला हे जर मनुवादी विषमतावादी धर्मवेड्या लोकांच्या मेंदूत घुसत,जात नाही.केवळ अभिनेता अमीर खान(मुस्लिम) याच्या नावाचा डोंगर पिठून विषमता वाढविण्याचा नाहक प्रयत्न करून चित्रपटावर बंदी टाकण्यात यावी.असा फतवा काढून फिरणारी व धर्माला मोठ करणारी मानसिकतायाच्यात वाढ होत आहे.पहा,”सत्य स्वीकारून असत्याचा नाश करणारी विज्ञान पिढी निर्माण होत नाही तोपर्यंत ‘धर्म’ हि संकल्पना कधी लोप पावणार नाही”.
कदाचित धर्म ही मानसिकता धम्मामुळे नक्कीच नाहीशी होईल.अर्थात अवघ्या बहुजन भारतीयांनी घरवापसी या माध्यमांतून भारतातील मुळ विज्ञान बौद्धधम्माकडेच वापसी करून येणाऱ्या शतकात अवघा भारत बौद्धमय असेल.कारण बुद्धधम्म हा मानव निर्मित असून वैज्ञानिक दृष्टीकोन अगदी सहजतेनं डोळसपणे महामार्गाकडे वाट दाखविणारा अर्थात सकाळचा उगवणारा युगसुर्य आहे.
राजेश सावंत (लेखक कवी , चेअरमन – ‘आसरा ‘ एज्युकेशन आणी सामाजिक संस्था)