Quantcast
Channel: AMBEDKAREE.com
Viewing all articles
Browse latest Browse all 860

⛳ हिंदू महार, नवबौद्ध 🎪ते 🕯🕯सक्षम बौद्ध समाज निर्मिती ☸☸☸ ..

$
0
0

⛳ हिंदू महार

नवबौद्ध 🎪

ते

🕯🕯बौद्ध ☸☸☸

🏼🏼🏼👌👌👌

मार्गक्रमणातील 1956 नंतरच्या  च्या  अडचणी/ समस्या/कारणे

☸1) तत्कालीन समाजाची  सामाजिक  परीस्थीती

☸2) धम्मदीक्षा परत घेऊन घरी आलेला अशिक्षित समाज

☸3)डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे धम्मदीक्षा घेतल्यावर लगेचच झालेले महापरिनीर्वाण

☸4) बौद्ध धम्म हा वैचारिक आणि विवेकवादी असल्याने आचरण आणि प्रचार प्रसार करणे आणि तेही गावकूसाबाहेरच्या एक वेळच्या खायची भ्रांत असलेल्या समाजास कठीण गोष्ठ होती

☸5) राजकारण विषयीचे वाढेलेले महत्व

☸6) डॉ आंबेडकरांचे असीम  तत्वज्ञान आणि बूध्दाचा मानवी बुद्दीचा कस घेणारा धम्म ह्याचा समन्वय साधणे ह्यामुळे गोंधळात असलेला धर्मातरीत नवबौद्ध समाज

☸7) जाता जात नाही ती जात बौद्ध धम्म ज्या महार जातीने ( तत्सम तश्या )ती अजून चिटकलेलि आहे. नवबौद्ध समाज हा दलित हरिजन आहे असे सदोदित सांगत भडिमार करणारे नेते माध्यमें सामाजिक व्यवस्था

☸8) हिंदूच्या सोबत व त्यांच्यावर अवलंबून असल्याने हिंदूचे अनुकरण करणे गावागांवात भाग पड़ते

☸9) धर्मांतरीत बौद्ध समाजाची संघभावना निर्माण करणारी सर्वोच्च संस्थामधील हेवेदावे

☸10) समग्र आंबेडकरी समाज म्हणून समाजाच्या फुटीच्या गहन प्रश्नावर नियंत्रण करणारी बौद्ध समाजाची सर्वव्यापी संस्था नसणे.

☸11) बौद्ध संस्कृती रुजवण्यात आलेले अपयश त्यामुळे दैनंदिन जीवनात हिंदू परंपरा रुढी  कायमस्वरुपी तश्याच आहेत

हिंदू महार❎

– नवबौद्ध 🔆

ते

✅बौद्ध ☸

ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी बौद्ध समाजाचा सामाजिक उत्कर्ष होण्यासाठी

उपाय

☸1) 60 वर्ष चळवळीचे धम्मक्रांतिचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे

☸2) बौद्ध धम्म संस्कॄती विकसीत करून हिंदू धर्म परंपरेला पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे त्यामुळे हिंदू धर्माचा पगडा कमी होण्यास मदत होईल

☸3) बौद्ध धम्म प्रणीत शाळा कॉलेज निवासी विहारे वस्तीगृहे मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्याची आवश्यकता असून  अश्या ठिकाणी बौद्ध समाज एकत्र येईल अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल

☸4) डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष हा लोकशाही मार्गाने पुनर्निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

उदा RPI पक्ष  नेत्याची पार्टी न होता पार्टीचे नेते निर्माण करण्याची गरज आहे

☸5) धम्मपरिषद धम्म संमेलने मोठ्या प्रमाणात घेण्याची गरज आहे

☸6) हिंदू धर्मीय आचरण करणाऱ्या समाजातील मंडळीना जाब विचारणार्यासाठी   प्रबोधन करण्यासाठी  भा बौ महासभा संस्थेने कठोर नियमावली बनवणे आवश्यक  आहे.

☸7)आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी उद्योजकता विकासासाठी समूहाने प्रयत्न होणे गरजेचं आहे

☸8) “चलो बुद्धविहार ” धम्मजागरण गावोगाव धम्मस्पर्धाचे मोठ्या प्रमाणात आयोजन व्हायला हवं आहे तसेच समता सैनिक दल सारख्या मातृसंस्थेत मोठ्या प्रमाणात  युवकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे

☸9) धम्मसहली आयोजित करणे लेण्याना  पर्यटकांकडुन मिळणारा पैसा बौद्ध समाजास वर्ग करून घेण्यास प्रयत्न व्हायला हवेत.

☸10) बौद्ध समाजास दलित /हरिजन कमी पणाची भावना निर्माण करणारे शब्द कृति ह्यावर कडक निर्बंध करणारे कायद्याची आवश्यकता

☸11) बौद्ध समाजाच्या सामाजिक उत्कर्षासाठी घटनादत्त आधिकार योजना ह्याची काटेकोर अमलबजावनीसाठी संघर्ष करणे अनिवार्य आहे

12) इतर धर्मीयांसारखी बौद्ध म्हणून आयडेंटी निर्माण करण्यासाठी बौद्ध म्हणून सुयोग्य आचरण जास्तीत जास्त समूहाने सातत्याने चालू ठेवणे अनिवार्य आहे.

बंधु/भगिनींनो वरील मुद्दे विस्तृत पणे न लिहिता सारांश रूपाने मांडले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा एक अनुयायी म्हणून जे मांडता आलं तसे मांडले आहे कदाचित वरील मुद्दे बरोबर नसतील ही परंतु ज्यांना वाटतं सक्षम बौद्ध समाज निर्मिती व्हावी त्यांनी पुढे येऊन कार्य करण्याची नितांत आवश्यकता नक्कीच आहे

 

लेखन

सचिन भवार

समस्त बौद्धजन समन्वयक पुणे

8796464928


Viewing all articles
Browse latest Browse all 860