भारतात अनेक धर्म आहेत.किंबहुना जगातल्या बहुसंख्य धर्माचे अनुयायी भारतात आहेत.भारतात उगम पावलेले व जगात प्रसार पावलेले अनेक धर्म व त्यांच्यातील जाती व पंथ आहेत.प्रामुख्याने भारतातत हिंदू ,मुस्लीम,सिख,ईसाई,बौध्द व जैन धर्म आहेत.त्या खालोखाल पारशी धर्म आहे.भारतात जी जातीव्यवस्था आहे ती प्रामुख्याने एका धर्मात पाहायला मिळते.तो म्हणजे हिंदू धर्म होय.भारतातील बहुसंख्य लोक हे हिंदू धर्माचे अनुयायी आहेत.बहुसंख्येने असल्याीमुळे हिंदू धर्माच्या विवीध पक्षातलेच राजकिय लोक आजवर देशाच्या मोठ्या पदावरती होते व आजही आहेेत.हिंदू धर्म हा धर्म नसुन ती एक जीवनपध्दती आहे असेही म्हटले जाते व हिंदू धर्मही विचारधारा आहे असेही म्हटले जाते.हिंदू खालोखाल मुुस्लीम धर्म आहे.या धर्मात शिया व सुन्नी असेे दोन पंथ आहेत.ईसाई धर्मातही कैथोलिक व प्रोटेस्टंट असे पंथ आहेत.शिखांमधे मागास लोक आहेत.जैनांमधे श्वेतांबर,दिगंबर पंथ आहेत.बौध्दामध्ये हिनयान व महायान हे पंथ आहेत.असे पंथ हिंदू धर्मात जरी नसले तरी हिंदुंमध्ये जातीव्यवस्था आहे.हिंदू धर्म हा ६५००पेक्षा जास्त जातीत विभागला आहे.ईतर धर्मात जरी वेगवेगळे पंथ असले तरी त्यांच्यामध्ये हिंसाचार झाल्याची उदाहरणे भारतात खुपच अल्प प्रमाणात पाहायला मिळतात.बहुसंख्य हिंदू धर्मातच असे जातीय अत्याचार पाहायला मिळतात.हिंदू धर्माचा पाया हा चातुर्वणावर उभारलेला आहे.ब्राम्हण,क्षत्रीय,वैश्य व शुद्र हे चातुर्वण जरी असले तरी त्यातही हजारो पोटजाती आहेत.या पोटजातींमध्ये रोटीबेटी व्यवहार होत नाही.यामुळे जातीयता हिंदूंमध्ये घट्ट आहे.वरच्या जातीतील हिंदु खालच्या जातीच्या हिंदूवर अत्याचार करतात.अत्याचाराचे प्रकारही वेहवेगळे आहेत.यात सगळ्यात जास्त भरडले जातात ते शुद्र.
वरचे तीनही वर्ग शुद्रांवर अत्याचार करतात.आजमितीला भारत देशात 27 मागासांवर अत्याचार केले जातात तर 3 अस्पृश्य महिलांवर बलात्कार होतो. तसेच 11 अस्पृश्यांवर हल्ला होतो. दर आठवडय़ात 13 अस्पृश्यांची हत्या केली जाते. 5 अस्पृश्याची घरे जाळली जातात. 6 अस्पृश्यांचे अपहरण केले जाते. असे दर 18 व्या मिनिटाला एका अस्पृश्यावर अत्याचार केला जातो.ही आकडेवारी संपुर्णता खरी आहे.या आकडेवारीचे संदर्भ इंटरनेटवर सहज उपलब्ध होतील.हे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने अस्पृश्य अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच एट्रोसिटीचा कायदा लागू केला आहे.हा कायदा वरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी केला आहे.ह्या कायद्याची अंमलबजावणी नीट होते का हा पण संशोधनाचा भाग आहे.एट्रोसिटी केस सरसकट नोंद करुन घेतली जात नाही.पोलीसांना जोवर खात्री पटत नाही तोवर एट्रोसिटी केस दाखल केली जात नाही हा पण एक महत्वाचा भाग आहे.अशा बऱ्याच केसेस राजकिय दबावाने दाबल्या जातात.तर काही केसेसमध्ये पोलीसच उदासिन असतात.पोलीसांची भूमिका अशा केसेसमध्ये फार महत्वाचा असते.या कायद्याचा गैरवापर करणारेही महाभाग आहेतच हे पण नाकारता येत नाही.पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.एट्रोसिटी केसची धमकी देवुन खंडणी उकळणारे खंडणीखोर उद्दाम महाभागही आहेत.पण असे लोक अती अल्प आहेत.त्यासाठी कायद्यात संशोधन व्हायला हवे यात दूमत नाही.पण याचा अर्थ हा कायदाच रद्द व्हावा असे महाराष्ट्रातील केवळ मराठा समाजातील काही संघटनांना वाटते.६५०० पेक्षा जास्त जाती असणाऱ्या भारतातील लोकांना असे वाटत नाही.केवळ मराठा समाजातील तथाकथीत पुढाऱ्यांना वाटते आहे़त्यांनी वर दिलेली जातीय अत्याचाराची आकडेवारी नीट पहावी.कोपर्डीसारख्या घटनांचा निषेध सर्वच मागासवर्गीय संघटनांनी केला आहे.
त्यासाठी मागासवर्गीय संघटनांनी अनेक मोर्चे व निदर्शनेही केली आहेत.कोपर्डीचे समर्थन कुणीही करत नाही.कोपर्डीच्या प्रकरणामुळे मराठा समाज जागा होतो आहे ही चांगली बाब आहे.महाराष्ट्रातील एक मोठा समुदाय एका चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येतोय हा चांगला संकेत आहे.बलात्कार,अत्याचार हे जातीय मानसिकतेतुन पाहणे मात्र चूक आहे.कोपर्डीच्या एका घटनेमुळे जर मराठा समाज धास्तावला तर असे अनेक अत्याचार रोजच घडत आहेत.त्या लोकांवर अन्याय अत्याचार करते कोण??हे देखील पाहीले जावे.अन्याय करणारे हे एकाच जातीचे नसतात.त्या प्रत्येक घटनांचे वेगवेगळे संदर्भ असतात.प्रत्येक घटनेचा संदर्भ हा ईतर घटनेपेक्षा वेगळा असतो.मराठा समाजातील संघटनांनी कोपर्डीच्या घटनेचा निषेध म्हणुन नगरला मुकमोर्चा आयोजित केला होता.इतर ठिकाणीही असेच मोर्चे निघाले.मोर्चात एकच सूर की एट्रोसिटी कायदा रद्द करावा.ज्यांना हा कायद रद्द करावा असा वाटतो त्यांनी मागास वर्गीयांवर होणारे अत्याचार कसे थांबवावेत हे पण सांगावे.एका कोपर्डी प्रकरणामुळे जर कायदा रद्द करण्याच्या गोष्टी होत असतील तर भारतात रोजच अशा असंख्य घटना मागासवर्गीयांबरोबर घडत आहेत.त्या रोखण्यासाठी काय करायला लागेल हे पण सांगावे.महाराष्ट्रातील जानते नेतेही या कोपर्डी प्रकरणाचा राजकिय फायदा घेवु पाहात आहेत.एकसंघ मराठा हा विषय जितका चांगला आहे तितकाच जाणत्या नेत्यांनाही तो फायद्याचा आहे.त्यांच्या गेलेल्या सत्तेला पुन्हा सत्तेत येण्याचा हा एक मार्ग ठरु शकतो याचा त्यांना अंदाज आहे.एट्रोसिटी कायद्याच्या विरोधातील लाटेवर स्वार होवुन मराठ्यांच्या एकत्रीकरणाचा राजकिय फायदा कसा घेता येईल याचे नियोजन आधीच झाल्याचे कोपर्डीच्या घटनेवरुन कळते.कोपर्डीत रामदास आठवले,प्रकाश आंबेडकरांना जाण्यास मज्जाव केला तो सुरक्षेच्या कारणांमुळे.पण तिथे ईतर समाजाचे नेते जावु शकले.हे कशाचे द्योतक आहे.प्रकाशजी व रामदास आठवलेजी हे नेते महाराष्ट्रातील नाहीत का?त्यांच्या भावना ईतर जातीतील नेत्यांईतक्या प्रामाणिक नाहीत का?मग असा अटकाव करणारे कोण?त्यांची मानसिकता काय आहे?ते कुणासाठी असा अटकाव करु शकले?हे पण विचार करण्यासारखे प्रश्न आहेत.एट्रोसिटीच्या विरोधकांनी हे लक्षात घ्यायला हवे की कायदे करणे व ते रद्द करणे ही एक खुपच क्लिष्ट प्रक्रिया आहे.मुळातच कायदे का करावे लागतात त्यामागची सामाजिक स्थितीही पाहून घ्या.आज जर कुणी राजकिय फायद्यासाठी कायदा रद्द करण्याची मागणी करत असेल तर तो राजकिय नेता निळीत पडलेला कोल्हा आहे जो इतरांच्या अज्ञानाचा व मागास विचारांचा फायदा घेत आहे असेच म्हणावे लागेल.मागासवर्गीयांचे दमन करण्यासाठी व उच्च वर्णियांच्या मानसिकतेचा फायदा घेवुन सत्तेत राहण्यासाठी असे तथाकथीत जाणते राजे खुप होतील.आमच्या मते जाणते राजे फक्त शिवराय होते जे आपल्या प्रजेला न्याय देत होते.त्यांच्या सैन्यात सर्व धर्मीय लोक होते.शिवरायांचा आदर्श जाणता राजा म्हणुन घ्यावा.स्वार्थासाठी मराठा व इतर ओबीसी समाजाच्या भावनांबरोबर खेळणाऱ्या बेगडी जाणत्या राजाचा आदर्श घेवु नये.हे जर मराठा समजला तर खुप झाले.सतीश कांबळे,कोल्हापुर.
↧
एट्रोसिटी व राजकारण………………
↧